MHWING

Government Schemes, Government Job, News, Tech, Education and Information

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२४ प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२४ प्रवेशपत्र/How to download MAHA TET admit card

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२४ चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबरला केले आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले गेले असून, परीक्षेच्या तारखेपर्यंत ते डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर सोय देण्यात आली आहे.



या वर्षी राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ‘पेपर -1’ साठी एकूण १ लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे आणि ही परीक्षा सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत ४३१ केंद्रांवर होणार आहे. दुसरीकडे, ‘पेपर -2’ साठी २ लाख १ हजार ३४० उमेदवार सहभागी होतील, ज्यासाठी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.



टीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षा केंद्रांवर जाण्याच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचन करावे.


दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या परीक्षेच्या आयोजनामुळे भावी शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतही तयारीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. Download halltiket आणि परीक्षेच्या तयारीला वेग धरा "Best of Luck"

प्रवेशपत्र डाउनलोड click hear

या वर्षी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पारदर्शक आणि सुरक्षित व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पहिल्यांदाच परीक्षेसाठी तीन उत्तरपत्रिका दिल्या जाणार आहेत, ज्यात एक मूळ उत्तरपत्रिका आणि दोन कार्बन प्रती असतील. यातील एक प्रत उमेदवाराकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, तर दुसरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेशी जमा केली जाईल. यामुळे निकाल घोषित करताना पारदर्शकता राखली जाईल आणि गैरप्रकार होण्याची शक्यता टाळता येईल.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, डॉ. नंदकुमार बेडसे, यांनी परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक पद्धतीने घेतले जातील तसेच डोळ्यांचे स्कॅनिंग देखील करण्यात येईल. चेहरा जुळण्याचे प्रमाण किमान ६८ टक्के राहावे, असे ठरवण्यात आले आहे, ज्यामुळे बनावट विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा प्रयत्न होणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांकडे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का याची तपासणी धातुशोधक यंत्राद्वारे केली जाणार आहे. 


याचबरोबर, परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सर्व उपाय परीक्षा सुरळीत, शिस्तबद्ध, आणि गैरप्रकारविरहित ठेवण्यासाठी आहेत.


या परीक्षेत तंत्रज्ञानाचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल. ‘AI’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, ज्यातून प्रत्येक वर्गातील हालचालींवर परीक्षा परिषदेकडून लक्ष ठेवले जाईल. वर्गात पर्यवेक्षक विद्यार्थ्यांशी बोलत असल्यास, उत्तर सुचवत असल्यास किंवा केंद्र संचालक एकाच ठिकाणी बसून राहिल्यास तसेच प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वाटपात विलंब होत असल्यास यासंदर्भातील सूचना थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेशी पोहोचणार आहेत. 


या अत्याधुनिक पद्धतींमुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मत आहे.

Post a Comment

0 Comments